Tuesday, July 25, 2017

नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार

वसंत गुर्जर यांना २०१६ सालचा 'नामदेव ढसाळ शब्द पुरस्कार' मुंबईत ३० एप्रिल २०१७ रोजी देण्यात आला. 'भारतीय भाषांतील कवितेत विशेष योगदान देणाऱ्या कवी'ला हा पुरस्कार देण्यात येतो. गुर्जर यांच्या संदर्भात पुरस्कार समितीनं नोंदवलेली टीप अशी: 

"१९६०नंतरच्या काळातील महत्त्वाचे कवी म्हणजे वसंत दत्तात्रेय गुर्जर. आधुनिकतावादी मराठी कवितेचा वेगळा आविष्कार त्यांच्या कवितारूपाने झाला. वसंत गुर्जरांच्या कवितेने महानगरीय संवेदनशीलतेचे वेगळे असे भान व्यक्त केले आहे. ‘गोदी’, ‘अरण्य’ व ‘समुद्र’ हे त्यांचे तीन संग्रह प्रकाशित झाले आहेत. लघुनियतकालिक चळवळीतले कवी म्हणून ते ओळखले जातात. महानगरातील कष्टकरी, श्रमकरी जगाला वेगळी अशी नीती कवितेतून प्राप्त करून दिली. मुंबईच्या कष्टकरी माणसांचे जग कवितेत मांडले. रूढ सांकेतिक काव्यभाषेपेक्षा स्वतंत्र कविताभाषा घडविली. गद्याचा कवितेतील लक्षवेधक वापर आणि तिरकसपणा या प्रयोगशीलतेतून नवी कविता घडविली. अलीकडील काळातील त्यांच्या कवितेतून जागतिकीकरण काळातील महानगरांचा कालस्वर त्यांनी मांडला."

डावीकडून आनंद जोशी, वसंत गुर्जर, निखिल वागळे

या कार्यक्रमात गुर्जर यांनी केलेलं भाषण खालील व्हिडियोमध्ये पाहाता-ऐकता येईल: